top of page

"या" शहरात झाली उच्चांकी तापमानाची नोंद; तापमानाचा पारा ४६.४ अंश सेल्सिअसवर

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होताना दिसत असून उकाड्याने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. शनिवारी चंद्रपुरात उच्चांकी ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून चंद्रपूर हे जगातील पाचव्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे. उत्तर आणि मध्य भारतातील तापमानात आणखी वाढ झाल्याने विदर्भातील उष्णतेची लाट तीव्र झाली असून, या विभागात देशातील विक्रमी तापमानाची नोंद होत आहे.

ree

देशाच्या उत्तर, उत्तर-पश्चिम आणि मध्य भागातील सर्वच राज्यांमध्ये दोन दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. त्याचा परिणाम म्हणून अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आणखी एक दिवस उष्णतेची लाट तीव्र राहणार असून, पुढील पाच दिवस लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. चंद्रपूरपाठोपाठ अकोला ४५.८, ब्रम्हपुरी ४५.६, वर्धा ४५.५, नागपूर व यवतमाळ ४५.२, अमरावती ४५ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

विदर्भाबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव आदी भागातही तापमानात मोठी वाढ होऊन उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव, नगर, सोलापूर ४३ ते ४४ अंश सेल्सिअस, तर पुणे, सातारा आदी भागात ४० अंशांवर कमाल तापमान आहे. मराठवाडय़ात ४२ ते ४४ अंशांदरम्यान कमाल तापमान आहे.



 
 
 

Comments


bottom of page