top of page

….पण हे सरकारला कळतच नाहीये

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्यांना 'लॉकडाऊन' लावण्याच्या मुद्यावर गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पुन्हा केंद्र सरकारला ट्विट करत लॉकडाउन लावण्याचा सल्ला दिला आहे.

ree

" भारत सरकारला हे लक्षात येत नाहीये की, या वेळी कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाउन हा एकमेव उपाय आहे. मात्र, समाजातल्या काही घटकांना न्याय (NYAY) योजनेचा लाभ घेता यायला हवा. सरकारच्या निष्क्रियतेने अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे." असं राहुल गांधी यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page