top of page

...असा नवरा उतावीळ झाला आहे की जो सत्ता सुंदरी केव्हा मिळेल, त्यासाठी....

एकनाथ खडसे यांचा भाजपवर हल्लाबोल

'कोल्हापूर : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी आणि मागच्या दारने सत्ता मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत, जोपर्यंत सत्ता मिळत नाही तो पर्यंत हे चालतंच राहणार आहे, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

ree

राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रेचा कोल्हापूरमध्ये समारोप झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार भाषणं करत भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना खडसे म्हणाले, ' सध्या राज्यात घाणेरडे राजकारण सुरु आहे, असे घाणेरडे राजकारण ४० वर्षात मी पहिले नाही. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. महागाईवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातोय, देवेंद्रजींचं असं झालंय की, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग,,, असा नवरा उतावीळ झाला आहे की जो सत्ता सुंदरी केव्हा मिळेल, एवढे अस्वस्थ झाले आहेत. त्यासाठी काय वाटेल ते करायची तयारी आहे.

ईडी पाठीमागे लावायची. अनिल देशमुख यांच्या घरावर ११० वेळा ईडीची धाड टाकली. ११० धाड टाकून काय मिळालं? असा सवालच खडसेंनी केला. 'माझा आणि संजय राऊत यांचा फोन टॅप केला होता. निवडणुकीच्या काळात माझ्या पीएचा फोन टॅप केला. माझे सहकारी असून फोन टॅप केला. ६७ वेळा फोन टॅप केला. इतकी हलकट आणि नीच प्रवृत्ती मी राजकारणात आजपर्यंत पहिली नाही' अशी जळजळीत टीकाही खडसेंनी केली.


'अजूनही हेच प्रकार सुरू आहे. सरकारला धक्का पोहोचत नाही. म्हणून हे प्रकार सुरूच आहे. जोपर्यंत सत्ता मिळत नाही तोपर्यंत असं सुरू राहील. पण शरद पवार जोपर्यंत या सरकारच्या पाठीशी उभे आहे, तोपर्यंत काहीही होणार नाही. २०२४ मध्येही महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि त्यामध्ये राष्ट्रवादी नंबरच एकच पक्ष राहणार आहे' असंही खडसे म्हणाले.



 
 
 

Comments


bottom of page