top of page

राज्य सरकारच्या 'या' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी; फडणवीस म्हणाले "... करुन दाखविले...!"

राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांची नाव बदलण्याच्या प्रस्तावाला आज ( शुक्रवार, दि. २४ ) अखेर मंजुरी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

ree

''औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’...!'' असं ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या मंजुरीचे पत्रही ट्विट केले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशिव’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. परंतु राज्यात सत्तांतर घडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळाने मंजूर केलेल्या प्रस्तावाला स्थगिती दिली. औरंगाबाद शहराचं नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं नामकरण ‘धाराशिव’ करण्याचा नवा प्रस्ताव मंजूर केला. यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. अखेर आज या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.


 
 
 

Comments


bottom of page