top of page

राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत उदय सामंत म्हणाले...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातली सर्व शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. सध्या ऑनलाईन शिक्षणावरच भर दिला जात आहे. मात्र आता महाविद्यालयं उघडण्यासंदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. उदय सामंत आज पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सीईटी परीक्षा झाल्यानंतर महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. सीईटी परीक्षेच्या तारखाही सामंत यांनी यावेळी जाहीर केल्या.

Comments


bottom of page