top of page

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात ; चौघांचा मृत्यू , आठ जखमी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दांडी येथील ४ जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले. जखमींना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. एकवीरा मातेचे दर्शन घेऊन हे कुटुंब पालघर तालुक्यातील बोईसर दांडी येथे परतत असताना हा अपघात घडला.

ree

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २१) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुंबईकडून दांडी येथे परतताना प्रवासी वाहनाने ट्रकच्या मागच्या बाजूने धडक दिल्याने हा अपघात झाला. यात ४ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी आहेत. हेमंत तरे (वय -६०), सुषमा आरेकर (वय -३२), चालक राकेश तमोरे (वय-४२), सर्वज्ञा आरेकर (वय-०२) अशी मृत झालेल्यांची नवे आहेत. तर, तृप्ती तामोरे (वय ३५), रमेश आरेकर (वय ५४) हे गंभीर जखमी आहेत.




 
 
 

Comments


bottom of page