top of page

... .तर शेतकरी आणि देशासोबत सर्वात मोठा विश्वासघात-राहुल गांधी

केंद्र सरकारने लादलेले काळे कृषी कायदे रद्द न होता इतर गोष्टींवर तडजोड झाली तर तो देशासोबत आणि शेतकऱ्यांसोबत सर्वात मोठा विश्वासघात ठरेल असं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ट्विट करुन त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंजाब, हरयाणामधल्या शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. हे कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी राहुल गांधी, काँग्रेस पक्ष आणि इतर विरोधक वारंवार करत आहे.

bottom of page