top of page

देशाच्या सुरक्षेत कसूर नाही-बिपीन रावत

कोविड साथीच्या आठ महिन्यांच्या काळात लडाखमधील सीमेवर तसेच तिबेट स्वायत्त क्षेत्रातही चीनच्या कारवायांमुळे पेच निर्माण झाला आहे. असे असले तरी कुठल्याही धोक्यास तोंड देण्यास आमची सैन्य दले सज्ज आहेत, भारतीय सैन्य दले देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात कुठलीही कसूर करणार नाहीत, असे संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी सांगितले.नौदलाच्या ‘हिमगिरी’ युद्धनौकेच्या जलावतरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांनी चीनच्या सीमेवरील कारवायांमुळे सीमेवर निर्माण झालेल्या तणावावर भाष्य केले आहे.

bottom of page