top of page

गोव्यामध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण

गोव्यातील सत्तारी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आयआयटी कॅम्पस उभारण्यासाठी आपल्या जमिनी देण्यास विरोध केला आहे.गोवा पोलिसांनी या प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण मिळालं. यावेळी पोलिसांनी आंदोलक गावकऱ्यांवर लाठीचार्जही केला. आंदोलनासाठी जमलेल्या गावकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांचा वापरही केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आंदोलक संतापले आणि त्यांनी पोलिसांनी दगडफेक केली. दोन्ही बाजूचे काही लोक जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

bottom of page