top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

ऐन दिवाळीत महाराष्ट्राचे दोन सुपुत्र शहीद

⬛ भाऊबीजेच्या दिवशीच भावाला अखेरचा निरोप देण्याची वेळ

जम्मू काश्मीर मधील उरी सेक्टर आणि गुरेज सेक्टर दरम्यान युद्धबंदी कराराचे उल्लंघन करत पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे पाच जवान शहीद झाले तर तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या शहीद जवानांमध्ये महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी या गावाचे सुपुत्र ऋषीकेश जोंधळे आणि नागपूर जिल्ह्यातील अंबाडा सोनक गावातील भूषण सतई शहीद झाले. ऐन दिवाळीत महाराष्ट्राचे दोन सुपुत्र सीमेवर शहीद झाले आहेत. त्यामुळे हळहळ व्यक्त होते आहे.

मुळचे कोल्हापूरचे असलेले ऋषीकेश जोंधळे पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले. त्यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या बहिरेवाडी या मूळगावी आणण्यात आलं. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना निरोप देण्यात आला. आज पाडवा आणि भाऊबीज आहे. भाऊबीजेच्या दिवशीच ऋषीकेश जोंधळे यांच्या चितेला त्यांच्या चुलत भावाने अग्नी दिला .ऋषिकेश यांना एक लहान बहीण आहे. आज भाऊबीजेचा दिवस हा भावाला ओवाळण्याचा दिवस. मात्र या दिवशीच भावाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

classi 2.jpg
bottom of page