top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

... तोवर चर्चा नाही

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकराने अखेर आज दुपारी चर्चेसाठी बोलावलं आहे. दरम्यान, देशात शेतकऱ्यांच्या ५०० पेक्षा अधिक संघटना आहेत, मात्र सरकारने केवळ ३२ शेतकरी संघटनांनाच चर्चेसाठी बोलावलं आहे. उर्वरीत संघटनांना चर्चेसाठी बोलावलं गेलं नाही. जोपर्यंत सर्व संघटनांना बोलावलं जात नाही. तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही,असं पंजाब किसान संघर्ष समितीचे सुखविंदर एस सब्रन यांनी सांगितलं आहे. मागण्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तर, नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

classi 2.jpg
bottom of page